आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा करायची ठरल्यास , परिक्षेचा विषय निघाला नाहीतर नवलच ! आज कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला परिक्षेच्या चक्रव्यूहाने पुरते घेरले आहे . वर्षभरात कमीत कमी ५-१० वेळेस परिक्षेला सामोरे जायला लागेल, ही कोणत्याही विद्यार्थ्याने मनाशी जणू खूणगाठच बांधलेली आहे.
माझा प्रश्न असा आहे की ,इतक्या साऱ्या परिक्षांतून आपण साधत तरी काय आहोत ? परीक्षा येतात मुले रट्टा मारतात ,मार्क्स मिळवितात आणि कालांतराने सर्व विसरून जातात . अशा शिक्षणाचा फायदा तरी काय ? परीक्षेत गुण मिळविले म्हणजे काय जग जिंकले काय ? आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जे शिक्षणाच्या परीक्षेत अपयशी ठरले असले, तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत मात्र बाजी मारली आहे. त्यामुळे परीक्षा हा काही गुणवत्तेचा मापदंड ठरू शकत नाही ,हे आपण लक्षात घ्यायल्या हवे.
खरतरं शिक्षण हे ज्ञान संपादीत करण्याचे साधन आहे , मात्र या परिक्षारूपी महाजालाने हे ज्ञान जखडून ठेवले आहे . परीक्षा असाव्यात परंतु त्यांची पद्धत आणि संख्या यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा या जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी उत्तेजीत करणाऱ्या ठराव्यात हीच एक विद्यार्थी म्हणून माझी अपेक्षा आहे.
skip to main |
skip to sidebar
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
-
▼
फेब्रुवारी
(10)
- सुसंवाद साधणे गरजेचे .....
- ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
- शिक्षणाचे बाजारीकरण
- शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
- कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
- मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
- महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
- विद्यार्थ्यांची मते !
- खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
- महासत्ता होणार तरी कशी?
-
▼
फेब्रुवारी
(10)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा