
माझा प्रश्न असा आहे की ,इतक्या साऱ्या परिक्षांतून आपण साधत तरी काय आहोत ? परीक्षा येतात मुले रट्टा मारतात ,मार्क्स मिळवितात आणि कालांतराने सर्व विसरून जातात . अशा शिक्षणाचा फायदा तरी काय ? परीक्षेत गुण मिळविले म्हणजे काय जग जिंकले काय ? आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जे शिक्षणाच्या परीक्षेत अपयशी ठरले असले, तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत मात्र बाजी मारली आहे. त्यामुळे परीक्षा हा काही गुणवत्तेचा मापदंड ठरू शकत नाही ,हे आपण लक्षात घ्यायल्या हवे.
खरतरं शिक्षण हे ज्ञान संपादीत करण्याचे साधन आहे , मात्र या परिक्षारूपी महाजालाने हे ज्ञान जखडून ठेवले आहे . परीक्षा असाव्यात परंतु त्यांची पद्धत आणि संख्या यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा या जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी उत्तेजीत करणाऱ्या ठराव्यात हीच एक विद्यार्थी म्हणून माझी अपेक्षा आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा