शुक्रवार, ४ जून, २०१०
का वाटवी मातृभाषेत शिकण्याची लाज?
सध्या जिकडे-तिकडे निकालांची चर्चा सुरू आहे.थोड्याच दिवसांत आपल्या पाल्यांच्या अॅडमिशनसाठी पालकांची धावपळ सुरू होईल.मग अनेक सल्ले येतील.आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायला पाहिजे हा नवीन अट्टहास सध्या जिकडे तिकडॆ सर्रास बघावयास मिळतो.अगदी रोजंदारीच्या कामावर जाणारा देखील म्हणतो की नाही मुलाला इंग्लिश मिडियममध्येच टाकायचे.
याचे परिणाम हळूह्ळू दिसायला सुरवात झाली आहे.महानगरपालिका-झेड.पी.च्या शाळा ओस पडतायत, तर दुसरीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळॆत बेमाप डोनेशन्स भरून केजीच्या प्रवेशासाठी दिवस-रात्र रांगेत उभे राहण्यासाठी लोक तयार आहेत.नुकतेच मुंबईत इंग्रजी माध्यम्याच्या शाळांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या संख्येपेक्षा अधिक झाली.ज्या मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी १०५ जण हुतात्मे झालेत,तेथे मराठीची ही दयनीय अवस्था बघून या १०५ आत्म्यांना कदाचित आपले बलिदान व्यर्थ गेल्यासारखे वाटत असेल.
खरंतरं मातॄभाषेतून घेतलेले शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण मानले जाते.आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.कलाम,अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर,महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे या असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींनी देखील आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मातॄभाषेतूनच घेतलेले आहे.शिवाय त्यांचे आजचे इंग्रजीवरील प्रभुत्त्व देखील आपण सर्व बघतच आहोत.परंतु आजकाल नवनवीन समजूतींमुळे लोक नको त्या गोष्टीकडे जास्त आकर्षिले जातात.असेच जर चालू राहिले तर उद्या कदाचित व्यवस्थित मराठी येणारा वर्ग या शिवाजी महाराजांच्या आपल्या १० कोटी जनतेच्या महाराष्ट्रात शोधावा लागेल.जगात प्रत्येक ठिकाणी आपल्या मातॄभाषेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले जातात.आपल्याकडेही असे प्रयत्न होतायेत,गरज आहे प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची!
सोमवार, २४ मे, २०१०
फक्त सक्तीने काय होणार?
कालच आमच्या घरी थोड्याशा बांधकामानिमित्ताने आलेल्या कामगारांमध्ये एका लहान १३-१४ वर्षांचा मुलाला बघितल्यावर मी त्याचाशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला असता मला समजले की,त्या मुलाने चार वर्षांपूर्वी पाचवीत असताना शाळा सोडली..... आणि तो सध्या बांधकामाच्या ठिकाणी वाळू/खडी वाहण्याचे काम करतो.लगेच मला आठवले की नुकताच भारत सरकारने शिक्षण सक्तीचा कायदा पास केला आहे आणि मनात विचार आला कदाचित उद्याही हीच परिस्थिती असली तर काय उपयोग होणार या कायद्याचा?
आज जरी बालमजूरांना कामावर ठेवणे गुन्हा असले तरी आपण हॉटेल,दुकाने,बांधकामे अशा सर्वच ठिकाणी बालमजूर राबताना सर्रासपणे दिसतात.इतकेच काय तर अगदी पोलीस स्टेशनसमोर परिसरात देखील असेच दृश्ये असतात.यावर विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की नुसते कायदे करून काही होत नाही.आपणास लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला पहिजे.ज्यांना दोन वेळ्चे जेवण धड नीट मिळत नाही ते काय शाळेत येणार?आणि शिवाय कसेबसे आलेच तर या महागाईच्या शिक्षणात जेथे मध्यमवर्गीय हैराण झाले तेथे काय तग धरणार?
त्यामुळे मुलांच्या घरचे त्यांना शाळेएवजी कामावर पाठवतात.यावर अशाच एका पालकाशी चर्चा केली असता त्याची प्रतिक्रिया अशी होती,"काय करणार शाळा शिकूण तो?नोकरीला थोडीचं लागणार आहे?आपल्याला काय परवडणार आहे का?मला आहे ३ मुलं आणि मी जातो १००-१५० रू रोजानी कामाला त्यात होणार आहे का हे सगळं?तो कामाला जातो तेवढाच घराला हातभार...."यावर विचार केला असता लक्षात आले की जेथे ३५ -४०% जनता दारिद्ररेषेखाली जगते तेथे अशी नाही मग कशी उत्तरे भेटणार?एकीकडे इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली दरवर्षी लाखो रूपये खर्च करून आपल्या पाल्याचे हवे ते चोचले पुरविणारा एक वर्ग आणि दुसरीकडे अशी स्थिती! यातून शिक्षण हे फक्त एका ठराविक वर्गासाठी मर्यादीत होत चालले आहे.
पण ही कोणत्याही न्यूज चॅनलसाठी न्यूज ठरत नाही तर त्यांना फक्त सलमान-कॅटरिनाच्या प्रेमप्रकरणाची वृत्ते, आय.पी.ल.च्या मॅचेसची दृश्ये आणि खेळांडूचे पानचट वागणुकी किंवा सानिया-शोएब यांच्या लग्नात जेवायला काय काय पदार्थ बनविले आहेत याचे चोवीस तास लाइव्ह टेलिकास्ट करण्यात धन्यता वाटते.मायबाप सरकारबद्द्ल काय बोलायचे,एखाद्या मंत्र्याला याबद्द्ल विचारले असता कदाचित साहेबांच्या मनात विचार येइल,’माझा मुलगा अमुक अमुक इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक खाजगी शाळेत हायफाय शिक्षण घेतो. बाकींच्याचा करूया की नंतर विचार!’ यामुळे आपल्या मूळ समस्या अजूनही तशाच आहेत,हे आपले दुर्दैवच!!!
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
महासत्ता होणार तरी कशी?
खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता माझ्या वाचनात आले ते बिल गेट्स यानी आपल्या २००३ मधील भारत दौरयावर असताना या विषयी वक्त केलेले मत ज्यात ते म्हणतात की, ”Word’s best education system is Indian education system!” एकीकडे आपण आपल्या स्वत:च्या शिक्षणव्यवस्थेच्या नावाने खडे फ़ोडत असताना दुसरीकडे हे जगातील सर्वश्रीमत व्यक्तीचे मत ! याचा आपण विचार करायला हवा.
शेवटी नाण्याला दोन बाजू असतात कोणत्या बाजूने बघायचं हे आपल्यावर असत. आपली शिक्षणव्यवस्था इतकीही कामतून गेलेली नाही,पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत,हे मलाही मान्य आहे. त्यात काळानुरूप बदल होणे अपरिहार्य आहे.
विद्यार्थ्यांची मते !
शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकमत व्रुत्तसमुहाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
९९% :- विद्यार्थ्यांच्या मते, रुढ शिक्षण पद्धतीत तात्काळ बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
७.७६% :- विद्यार्थ्यांना बदलांची भीती वाटते .
१६.५% :- विद्यार्थ्यांच्या मते, प्राध्यापकांना शिकवता येत नाही.
२३.३% :- विद्यार्थी म्हणतात लेक्चर्स अटेंड करायला ‘बोअर’ होत.
४१.६% :- विद्यार्थ्यांच्या मते , दोष ना आमचा,ना प्राध्यापकांचा, ‘सिस्टम’ च विचित्र आहे !
३६% :- विध्यार्थ्याना उनाडपणाचा आरोप मान्य आहे.
५५% :- विध्यार्थ्याना वाटते, आमचा आम्ही अभ्यास करू शकतो; तर लेक्चर्सला का बसायचे.
८६% :- विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचे स्वागत करायला उत्सुक आहेत .
या सर्व अहवालाची आकडेवारी २००० विविध शाखेच्या, विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेली आहे.शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.
महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
हा झाला एक गंमतीचा भाग परंतु आज या सिनेमातील वाक्याच्या निम्मित्ताने मला येथे प्रश्न उपस्थित करावसा वाटतो की, आज स्वातंत्र्याची साठी ओलांडलेल्या , जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या माझ्या देशात मुलांना त्यांच्या आवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य नसावे का ? उद्याचा समाज हा काय फक्त डॉक्टर , इंजीनियर यांनीच बनणार आहे का ? या समाजाला चित्रकार , लेखक ,गायक ,खेळाडू यांची गरजच असणार नाही का ?
कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.
शिक्षणाचे बाजारीकरण
भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे महाभाग जनतेला लूटत आहेत .केजी पासून पीजी पर्यंत यांचा धंदा पसरला आहे .काही ठिकाणी तर केजीच्या डोनेशननी ५०००० ची पातळी गाठली आहे .यामुळे शिक्षण केवल गरिबांनाच नव्हेतर मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारे झालेले आहे आणि अशीच परिस्थिती राहिली ,तर ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल .
आत्महत्त्या करणारा शेतकरी असो ,३८०० रुपये पगारावर काम करणारा पोस्टमन असो किंवा अन्य कोणीही असो शिक्षणाच्या या बाजारीकरणाने पुरता हैराण झाला आहे.शासनाने या विरुध कड़क धोरण अवलंबिले पाहिजे,परंतु सरकारमधील मंत्र्याची वागणूक म्हणजे खाटकाचे दुकान खोलून शाकाहारी बनण्याचा प्रचार करण्यासारखे आहे, कारण बहुतेक शिक्षणसंस्था या मंत्र्यांच्याच आहेत .
ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
माझा प्रश्न असा आहे की ,इतक्या साऱ्या परिक्षांतून आपण साधत तरी काय आहोत ? परीक्षा येतात मुले रट्टा मारतात ,मार्क्स मिळवितात आणि कालांतराने सर्व विसरून जातात . अशा शिक्षणाचा फायदा तरी काय ? परीक्षेत गुण मिळविले म्हणजे काय जग जिंकले काय ? आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जे शिक्षणाच्या परीक्षेत अपयशी ठरले असले, तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत मात्र बाजी मारली आहे. त्यामुळे परीक्षा हा काही गुणवत्तेचा मापदंड ठरू शकत नाही ,हे आपण लक्षात घ्यायल्या हवे.
खरतरं शिक्षण हे ज्ञान संपादीत करण्याचे साधन आहे , मात्र या परिक्षारूपी महाजालाने हे ज्ञान जखडून ठेवले आहे . परीक्षा असाव्यात परंतु त्यांची पद्धत आणि संख्या यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा या जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी उत्तेजीत करणाऱ्या ठराव्यात हीच एक विद्यार्थी म्हणून माझी अपेक्षा आहे.
सुसंवाद साधणे गरजेचे .....
खरतरं विद्यार्थी आणि प्राध्यापक हे शिक्षणरूपी गाडीची दोन चाके आहेत ,ज्याप्रमाणे गाडीतील दोन चाकांतील समन्वयाशिवाय गाडी मार्गक्रमण करू शकत नाही ,त्याप्रमाणे शिक्षणाची
ही गाडीदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील समंवयाशिवाय यशस्वी मार्गक्रमण करू शकत नाही
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील दिवसागणिक वाढणारी ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न आवश्यक आहेत .त्यांच्यामध्ये केवळ पुस्तक, डिग्री इतकेच संबंध न राहता मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे ........
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
- ► फेब्रुवारी (10)