'साखरसम्राट ' या शब्दानंतर महाराष्ट्रात 'शिक्षणसम्राट' हा शब्द प्रचलित होवू लागला आहे .साखरसम्राटांनी ज्या प्रमाणे उस उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले, त्याप्रमाणे आज हे शिक्षणसम्राट सर्व जनतेला वेठीस धरत आहेत .एखाद्या व्यवसायाप्रमाणे या शिक्षणसम्राटांनी शिक्षणाची दुकाने उघडली आहेत.
भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे महाभाग जनतेला लूटत आहेत .केजी पासून पीजी पर्यंत यांचा धंदा पसरला आहे .काही ठिकाणी तर केजीच्या डोनेशननी ५०००० ची पातळी गाठली आहे .यामुळे शिक्षण केवल गरिबांनाच नव्हेतर मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारे झालेले आहे आणि अशीच परिस्थिती राहिली ,तर ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल .
आत्महत्त्या करणारा शेतकरी असो ,३८०० रुपये पगारावर काम करणारा पोस्टमन असो किंवा अन्य कोणीही असो शिक्षणाच्या या बाजारीकरणाने पुरता हैराण झाला आहे.शासनाने या विरुध कड़क धोरण अवलंबिले पाहिजे,परंतु सरकारमधील मंत्र्याची वागणूक म्हणजे खाटकाचे दुकान खोलून शाकाहारी बनण्याचा प्रचार करण्यासारखे आहे, कारण बहुतेक शिक्षणसंस्था या मंत्र्यांच्याच आहेत .
skip to main |
skip to sidebar
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
-
▼
फेब्रुवारी
(10)
- सुसंवाद साधणे गरजेचे .....
- ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
- शिक्षणाचे बाजारीकरण
- शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
- कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
- मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
- महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
- विद्यार्थ्यांची मते !
- खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
- महासत्ता होणार तरी कशी?
-
▼
फेब्रुवारी
(10)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा