
भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे महाभाग जनतेला लूटत आहेत .केजी पासून पीजी पर्यंत यांचा धंदा पसरला आहे .काही ठिकाणी तर केजीच्या डोनेशननी ५०००० ची पातळी गाठली आहे .यामुळे शिक्षण केवल गरिबांनाच नव्हेतर मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारे झालेले आहे आणि अशीच परिस्थिती राहिली ,तर ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल .
आत्महत्त्या करणारा शेतकरी असो ,३८०० रुपये पगारावर काम करणारा पोस्टमन असो किंवा अन्य कोणीही असो शिक्षणाच्या या बाजारीकरणाने पुरता हैराण झाला आहे.शासनाने या विरुध कड़क धोरण अवलंबिले पाहिजे,परंतु सरकारमधील मंत्र्याची वागणूक म्हणजे खाटकाचे दुकान खोलून शाकाहारी बनण्याचा प्रचार करण्यासारखे आहे, कारण बहुतेक शिक्षणसंस्था या मंत्र्यांच्याच आहेत .
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा