बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !

२००९ च्या निवडणुकीनंतर शिक्षण कृषी ही दोन्ही महत्त्वाची खाती बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली . शिक्षणासारख्या महत्त्वाचे खाते एका कृषी खात्यातील तज्ञ्ज्ञ व्यक्तीकडे देण्याच्या निर्णयावरून शासनाची शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसून येते.
एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.











0 comments:

टिप्पणी पोस्ट करा