
अभियांत्रीकीचा विद्यार्थी असल्याने या शाखेशी संबंधीत एका सर्व्हेची आकडेवारी सादर करतांना मला अत्यंत दुःख होते . जी आकडेवारी असे दर्शविते की, ७०% अभियांत्रीकीचे विद्यार्थी सिगारेट ,दारू ,गुटखा यांसारख्या व्यसंनाच्या विळख्यात सापडलेले आहेत .याची कारणे जरी काहीही असतील ,तरी व्यसन हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही.
खरतर शिक्षण हे संस्कृती टिकविण्याचे माध्यम म्हणून ओळखले जाते,परंतु सध्याच्या तरूणाईने आपल्या वागणुकीतून ज्ञानमंदीरांचा अर्थच बदलून टाकलाय.याला वेळीच आळा घातला नाही तर ज्यांच्या जोरावर भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे ,तेच देशाला दरिद्र्यात लोटायचे, असंस्कृतीच्या दारिद्रयात!
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा