बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

सुसंवाद साधणे गरजेचे .....


परवाच महाराष्ट्र टाईम्समधील लेख वाचला ,ज्यात लिहले होते की ,आय.आय. टी. सारख्या उच्चाविभुषित शिक्षणसंस्थांमधे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील सुसंवाद कमी होत चाललाय.आय.आय. टी. ,आय.आय.एम. या केवळ भारतातीलच जगातील नामांकीत संस्था आहेत . तेथेच जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या संस्थांविषयी चर्चा न केलेलीच बरी !
खरतरं विद्यार्थी आणि प्राध्यापक हे शिक्षणरूपी गाडीची दोन चाके आहेत ,ज्याप्रमाणे गाडीतील दोन चाकांतील समन्वयाशिवाय गाडी मार्गक्रमण करू शकत नाही ,त्याप्रमाणे शिक्षणाची
ही गाडीदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील समंवयाशिवाय यशस्वी मार्गक्रमण करू शकत नाही
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील दिवसागणिक वाढणारी ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न आवश्यक आहेत .त्यांच्यामध्ये केवळ पुस्तक, डिग्री इतकेच संबंध न राहता मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे ........

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा