बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?


गेल्या एक - दीड महिन्यांपासून सतत विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेच्या बातम्या ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की , समोर आयुष्याचा प्रचंड मोठा पट असतांना ,ज्यांना आयुष्य म्हणजे काय हे उमगलेले नसते ,अशा वयातील विद्यार्थी आत्महत्त्या का करत आहेत ? या सुंदर कळया उमलाण्याआधीच का गळून पडताहेत ?
तज्ञ्ज्ञांच्या मते ,अभ्यासाचे ओझे ,आई - वडिलांच्या अपेक्षा, शिक्षक, स्पर्धा ,परिक्षेतील अपयश ,सततचा ताणतणाव या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते .यांपैकी कोणताही एक घटक आत्महत्तेला १०० % जबाबदार असतो किंवा १०० % जबाबदार नसतो॰सततचा दबाब मुलांना आणि जर तो ते झुगारू शकले नाही के ते नैराश्येत लोटले जातात अणि त्यातून ते आत्महत्त्येचा विचार करतात.

आत्महत्तेचे हे लोण फक्त कॉलेजमधील तरूणांपुरते मर्यादीत न राहता पाचवी-सातवीतील चिमुकल्यांपर्यंत येउन पोचलेले आहे . यातच आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश दिसून येते . आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी निश्चितच राहिलेले नाही . याला वेळीच आळा घातला नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील काळात आपल्यासमोर येतील.

यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे .यासाठी पुढील गोष्टींचा विचार करायला हवा.

१) पालकांनी ,शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केवळ मार्क्ससाठी दबाव टाकू नये.

२) मुलांना त्यांचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य असावे .

३) दोन विद्यार्थांमध्ये मार्क्सच्या आधारे तुलना होउ नये .

४) विद्यार्थ्यांमध्ये जिद्द ,सहकार्याची भावना , अपयश पचाविण्याची वृत्ती बिंबविणे गरजेचे आहे.

५) शासनाने आत्महत्त्या रोखण्यासाठी एक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करावे.

६) विद्यार्थ्यानी न डगमगता परिस्थितीला तोंद द्यायला शिकावे .

७) अभ्यास ही एक ’एन्जॉएबल’ गोष्ट असायला हवी.

8) पैसा हेच सर्वस्व नाही हे सर्वांनी समजून घ्यायला हवे.

या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला तर कदाचीत उद्या हे आत्महत्त्यांचे लोण काही प्रमाणात का होईना कमी झालेले असेल.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा