बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!

थ्री इडियट सिनेमा मला वाटतं सर्वांनीच बघितला असेल ! प्रत्येकाला त्यातील कोणता ना कोणता डायलॉग लक्षात राहिला असेल .माझ्या आठवाणीत राहिलेला डायलॉग म्हणजे ," बेटा हुआ तो इंजीनियर, बेटी हुई तो डॉक्टर!" हा व्हायरसचा डायलॉग...
हा झाला एक गंमतीचा भाग परंतु आज या सिनेमातील वाक्याच्या निम्मित्ताने मला येथे प्रश्न उपस्थित करावसा वाटतो की, आज स्वातंत्र्याची साठी ओलांडलेल्या , जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या माझ्या देशात मुलांना त्यांच्या आवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य नसावे का ? उद्याचा समाज हा काय फक्त डॉक्टर , इंजीनियर यांनीच बनणार आहे का ? या समाजाला चित्रकार , लेखक ,गायक ,खेळाडू यांची गरजच असणार नाही का ?
मुलांच्या आवडीनिवडी लक्षात न घेता केवळ ज्या क्षेत्रांतून जास्तीत जास्त पैसा कमविता येईल,अशी क्षेत्रे त्यांच्यावारती लादली जाताहेत . पैसा हेच सर्वस्व आहे हे त्यांच्यावर बिबंविण्यात येत आहे . परंतु या चुकीच्या अट्टहासामुळे मुलांची फरपड होत आहे . असाच विचार जर सचिन तेंडुलकर, शरद पवार ,लता मंगेशकर,एम् एफ हुसेन यांच्याबाबतीत झाला असता तर कदाचित आज या व्यक्ती यशाच्या शिकारावर नसत्या ! आणि इतक्या श्रीमंत देखील नसत्या !
अजूनही वेळ गेलेली नाही ,पालकांनी मुलांना करियर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. तसेच त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रोत्साहनही द्यावे . शेवटी पैसा हेच सर्वस्व नाही हे आपण मान्य करायला हवे . आवडीच्या कामात मिळणारा आनंद काही वेगळाच असतो . त्यातून आपण जगावर राज्य करू शकतो आणि राहिला प्रश्न पैशांचा तर तो आपण वर बघितलेल्या उदाहरणांवरून समजून घ्यायला हवा !

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा