
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०
महासत्ता होणार तरी कशी?

खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता माझ्या वाचनात आले ते बिल गेट्स यानी आपल्या २००३ मधील भारत दौरयावर असताना या विषयी वक्त केलेले मत ज्यात ते म्हणतात की, ”Word’s best education system is Indian education system!” एकीकडे आपण आपल्या स्वत:च्या शिक्षणव्यवस्थेच्या नावाने खडे फ़ोडत असताना दुसरीकडे हे जगातील सर्वश्रीमत व्यक्तीचे मत ! याचा आपण विचार करायला हवा.
शेवटी नाण्याला दोन बाजू असतात कोणत्या बाजूने बघायचं हे आपल्यावर असत. आपली शिक्षणव्यवस्था इतकीही कामतून गेलेली नाही,पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत,हे मलाही मान्य आहे. त्यात काळानुरूप बदल होणे अपरिहार्य आहे.
विद्यार्थ्यांची मते !

शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकमत व्रुत्तसमुहाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
९९% :- विद्यार्थ्यांच्या मते, रुढ शिक्षण पद्धतीत तात्काळ बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
७.७६% :- विद्यार्थ्यांना बदलांची भीती वाटते .
१६.५% :- विद्यार्थ्यांच्या मते, प्राध्यापकांना शिकवता येत नाही.
२३.३% :- विद्यार्थी म्हणतात लेक्चर्स अटेंड करायला ‘बोअर’ होत.
४१.६% :- विद्यार्थ्यांच्या मते , दोष ना आमचा,ना प्राध्यापकांचा, ‘सिस्टम’ च विचित्र आहे !
३६% :- विध्यार्थ्याना उनाडपणाचा आरोप मान्य आहे.
५५% :- विध्यार्थ्याना वाटते, आमचा आम्ही अभ्यास करू शकतो; तर लेक्चर्सला का बसायचे.
८६% :- विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचे स्वागत करायला उत्सुक आहेत .
या सर्व अहवालाची आकडेवारी २००० विविध शाखेच्या, विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेली आहे.शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.
महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?

मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!

हा झाला एक गंमतीचा भाग परंतु आज या सिनेमातील वाक्याच्या निम्मित्ताने मला येथे प्रश्न उपस्थित करावसा वाटतो की, आज स्वातंत्र्याची साठी ओलांडलेल्या , जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या माझ्या देशात मुलांना त्यांच्या आवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य नसावे का ? उद्याचा समाज हा काय फक्त डॉक्टर , इंजीनियर यांनीच बनणार आहे का ? या समाजाला चित्रकार , लेखक ,गायक ,खेळाडू यांची गरजच असणार नाही का ?
कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?

शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !

एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.
शिक्षणाचे बाजारीकरण

भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे महाभाग जनतेला लूटत आहेत .केजी पासून पीजी पर्यंत यांचा धंदा पसरला आहे .काही ठिकाणी तर केजीच्या डोनेशननी ५०००० ची पातळी गाठली आहे .यामुळे शिक्षण केवल गरिबांनाच नव्हेतर मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारे झालेले आहे आणि अशीच परिस्थिती राहिली ,तर ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल .
आत्महत्त्या करणारा शेतकरी असो ,३८०० रुपये पगारावर काम करणारा पोस्टमन असो किंवा अन्य कोणीही असो शिक्षणाच्या या बाजारीकरणाने पुरता हैराण झाला आहे.शासनाने या विरुध कड़क धोरण अवलंबिले पाहिजे,परंतु सरकारमधील मंत्र्याची वागणूक म्हणजे खाटकाचे दुकान खोलून शाकाहारी बनण्याचा प्रचार करण्यासारखे आहे, कारण बहुतेक शिक्षणसंस्था या मंत्र्यांच्याच आहेत .
ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?

माझा प्रश्न असा आहे की ,इतक्या साऱ्या परिक्षांतून आपण साधत तरी काय आहोत ? परीक्षा येतात मुले रट्टा मारतात ,मार्क्स मिळवितात आणि कालांतराने सर्व विसरून जातात . अशा शिक्षणाचा फायदा तरी काय ? परीक्षेत गुण मिळविले म्हणजे काय जग जिंकले काय ? आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जे शिक्षणाच्या परीक्षेत अपयशी ठरले असले, तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत मात्र बाजी मारली आहे. त्यामुळे परीक्षा हा काही गुणवत्तेचा मापदंड ठरू शकत नाही ,हे आपण लक्षात घ्यायल्या हवे.
खरतरं शिक्षण हे ज्ञान संपादीत करण्याचे साधन आहे , मात्र या परिक्षारूपी महाजालाने हे ज्ञान जखडून ठेवले आहे . परीक्षा असाव्यात परंतु त्यांची पद्धत आणि संख्या यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा या जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी उत्तेजीत करणाऱ्या ठराव्यात हीच एक विद्यार्थी म्हणून माझी अपेक्षा आहे.
सुसंवाद साधणे गरजेचे .....

खरतरं विद्यार्थी आणि प्राध्यापक हे शिक्षणरूपी गाडीची दोन चाके आहेत ,ज्याप्रमाणे गाडीतील दोन चाकांतील समन्वयाशिवाय गाडी मार्गक्रमण करू शकत नाही ,त्याप्रमाणे शिक्षणाची
ही गाडीदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील समंवयाशिवाय यशस्वी मार्गक्रमण करू शकत नाही
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील दिवसागणिक वाढणारी ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न आवश्यक आहेत .त्यांच्यामध्ये केवळ पुस्तक, डिग्री इतकेच संबंध न राहता मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे ........
मला फेसबूकवर भेटा...
जरा इकडेपण बघा !!!
अभिप्राय आपला
Blog Archive
-
▼
2010
(12)
-
▼
फेब्रुवारी
(10)
- सुसंवाद साधणे गरजेचे .....
- ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?
- शिक्षणाचे बाजारीकरण
- शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !
- कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?
- मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!
- महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?
- विद्यार्थ्यांची मते !
- खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
- महासत्ता होणार तरी कशी?
-
▼
फेब्रुवारी
(10)